तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेडयाला, रिंडोजी नुसता. श्याम्या, अरे काटर्या! उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर. श्वास धरलंन् वाटते. तू मरत नाहीस. तू मात्र छळायला उरला आहेस.' आई रागावून दु:खसंतापाने वेडी होऊन बोलत होती.
आईचे शब्द मी ऐकत होतो. परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणार्याऐ रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेर्याल घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली.
आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे, हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवाहवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही, आपले जीवन म्हणजे सर्वांना भार! सर्वांना त्यापासून
होतो.
'का, रे बाजूला बसलास?' आईने विचारले.
'आई! मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे!' मी म्हटले.
आई हसली व म्हणाली, 'अरे वेडया, सुतक नको हो धरावयाला.'
मी म्हटले, 'आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो, ते?'
आई म्हणाली, 'माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्या जवळ असणार्याी मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे; म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत. म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता! बिचारे वरून