पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी.

त्या वेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते. परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले. ब्राह्मणवस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रध्दा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता.

आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीणबाई मोठया भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, 'राधाताई! तुमच्याकडे काही काम असेल, तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल.' राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल


411 of 468

हवा. पोत चांगले हवे. किंमत काय, ते विचारावयास मी आलो आहे. दोन-तीन नमुने दे. ते मी घरी दाखवून आणतो.' असे मी सांगितले.

मोहन्या मारवाडयाने दोन-तीन प्रकारचे धोतरजोडे दिले. अमृतशेट म्हणाले, 'दाखवून लौकर आण, हो श्याम.'

'आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले, तर पैसे देऊ.' असे मी अभिमानाने म्हटले.

'तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे? बापाजवळ तर फद्या नाही!' अमृतशेट म्हणाले.

मला ते शब्द ऐकून वाईट वाटले, अमृतशेटांचे आम्हांला कर्ज होते, म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणार्याटने मरावे; परंतु कर्ज कधी काढू नये.


411 of 773