मी गोवार्यांबबरोबर रानात जात असे. गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी; पण तिच्यात केवढी शक्ती! हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. दोन रूपये त्यांना पडतात. परंतु खेडयापाडयांतील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर! बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेडयांत ते वाजविले जात आहे! वाजव, आळव ते गीत.'

'परंतु ती पहा घंटा वाजत आहे! प्रार्थनेस चला.' गोविंदा म्हणाला.


'हो चला. काय रे गोविंदा ! काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लौकर आटपीन.' श्याम म्हणाला.


'काल दहाबारा मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात, त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ


42 of 468

पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहात. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेडयांतील लोक आम्हांला खोत म्हणून संबोधीत.'

"खोत म्हणजे काय?' भिकाने प्रश्न विचारला.


श्याम म्हणाला, 'खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल.'


"त्याला काही मिळत नाही का?' रामने विचारले.


"हो, मिळते तर ! सरकारी शेतसार्या.च्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला


42 of 773