तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता.
'अरे चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात?' असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात, तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते; परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती! हसर्याच मुलाला सारे घेतात, रडणार्यातला कोण घेणार? वास्तविक रडणार्यालला घेण्याची जास्त जरूरी असते; परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दु:खाला कोणी नाही. दीनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरूरी त्यालाच त्याची अत्यंत वाण.
'दीनको दयालू
असे. तेथून दिवसाढवळयाही जावयास नवशिक्यास भय वाटे ! परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भुतेखेते, जीवजीवाणू, कसलेच भय त्यांना वाटत नसे.
भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडुपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोटया बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले. झटकन् गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर