'श्लोक म्हटला.'

आईने पुन्हा विचारले, 'कोणता म्हटलास?तो म्हटलेला लोकांना आवडला का?'

पुन्हा मी खोटे सांगितले की, 'नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे' हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का?


नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।

माथां सेंदुर पाझरे वरि बरे दूर्वांकुरांचे तुरे ॥

माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ॥

गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥


मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोडया करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकांस मार बसवावयाचा, हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंडया, बन्या, वासू सारे आले व आईला म्हणाले, 'यशोदाकाकू! तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते; परंतु याने म्हटलाच नाही.'

'श्यामनेच मला शिकविलेला 'भरूनि


97 of 468

म्हणाली.

मी ताम्हन आणावयास गेलो; परंतु ताम्हनातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टद्न झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली.

'हे रे काय, पाणीसे ठिबकते आहे? कळयाच तोडून आणल्या होत्यास वाटते? तरीच नीट फुलली नाहीत. श्याम ! अरे झाडावर नीट फूलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय अधाशासारखा गेलास उतावळा होऊन?' असे आई मला बोलत होती. तोच शास्त्रीबोवांकडची, धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुले आली.

'श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून!


97 of 773